डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागरिक उद्यानात येतात, प्रवेशाच्या वेळा रद्द करा – नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन
पिंपरी | महाईन्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्व बहुजनांना प्रेरित आहे. बाबासाहेब हे सर्वांच्या श्रध्दास्थानी आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यान हे काही फिरण्याचे ठिकाण नाही. याठिकाणी नागरिकांना प्रवेश देण्यासाठी निश्चित केलेल्या वेळा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 21 ऑक्टोबर रोजी उद्याने खुली करण्याचा आयुक्तांनी आदेश काढला. त्यात उद्यानाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. आंबेडकर उद्यानात नागरिकांना सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते आठ पर्यंत प्रवेश दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांच्या श्रध्दास्थानी आहेत. त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी नागरिक त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार येत असतात. तरी, उद्यान विभागाने ठरवून दिलेल्या वेळा त्वरीत रद्द करण्यात याव्यात, असे नगरसेवक त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे सूचित आहे.