खरोखरच महाराष्ट्रात पुन्हा रयतेचे स्वराज्य निर्माण व्हावे – सौ. कुंदाताई भिसे

  • पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालयात ”शिवराज्याभिषेक दिन” उत्साहात साजरा

पिंपरी (प्रतिनिधी) :- रयतेचे सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन हा भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कटालणी देणारा दिवस आहे. या सोहोळ्याच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी शिवराज्याभिषेक दिनी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील लोककल्याणकारी, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होऊन खरोखरच महाराष्ट्रात रयतेचे स्वराज्य पुन्हा निर्माण व्हावे, असे मत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले.

पिंपळे सौदागर येथील सौ. कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संजय (आबा) भिसे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यावर शास्रोक्त मंत्राचा जप करत पंचामृत अभिषेक घालण्यात आला. उपस्थितांनी ”छत्रपती शिवाजी महाराज की जय”, ”जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा दिल्या.

यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय आबा भिसे, अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे, डॉ. सुभाषचंद्र पवार, रमेश वाणी, राजेंद्र जयस्वाल, विलास जोशी, ढाकणे सर, रमेश चांडगे, एन के पवार, लिगाडे सर, मधुकर पाटील, दीपक नागरगोजे, उन्नति सोशल फाउंडेशन, विठाई वाचनालय, व ऑल सिनियर सिटिझन असोसिएशनचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


”उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम घडवून आणला, ही चांगली प्रथा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व कळते. महाराजांचे गुण सर्वांनी आत्मसात करून देशाच्या प्रती आणि स्वराज्याच्या प्रती निष्ठा बाळगली पाहिजे ”, अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

Share to