होळी आणि शिमग्यात फरक, भाजपनं शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्यावा – खासदार संजय राऊत
मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर येथे प्रचारावेळी २०२४ मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार सत्तेत येईल. असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावरून आता राज्यातील राजकारण तापले असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले,’महाराष्ट्राचा रंग स्वाभिमानाचा, ऐक्यतेचा, अखंडतेचा आहे हे त्यांनी समजून घ्यावं. भाजप नकली रंग उधळत आहे. भाजपचा भगवा भेसळयुक्त आहे, सध्या महाराष्ट्रात रोजच धुळवड खेळली जात आहे. पण वर्षातून एकदा अशा लोकांची धुळवड करायला हरकत नाही. होळी आणि शिमग्यात फरक आहे. भाजपनं शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. त्या पद्धतीनं रंग खेळावेत.
केंद्रीय यंत्रणांना घाबरत नाही, विरोधकांनी सुसंस्कृतपणा, राजकारणातील विनोद, संवेदनशील मन नष्ट केलं आहे. या राज्यात असं वातावरण कधीच नव्हतं, जे दुर्देवाने आमच्या भाजपच्या मित्रांनी करुन ठेवलं आहे.
ते पुढे म्हणाले,’काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही. अडीच वर्ष झाले महाविकास आघाडी सरकारला. पुढचे अडीच वर्षही आम्ही सत्तेत राहणार आहोत आणि त्यानंतरचे पाच वर्षही आम्हीच सत्तेत राहू. देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न करत राहावं. ते आता गोवा जिंकून आले आहेत. मात्र गोवा काय आहे हे लवकरच भाजपला कळेल. गोवा पोर्तुगाल आणि इंग्रजांनाही कळला नव्हता.’
तत्पूर्वी, महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात अडकले असून जनतेचा आघाडी सरकारमधील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. चार राज्यात यश मिळाले. आता मिशन महाराष्ट्र आहे. २०२४ मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार सत्तेत येईल विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता.