‘संवेदनशीलता कमी होते, तेव्हाच भोंग्याच्या आवाजावरून स्पर्धा सुरु होते’, आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना टोला

पिंपरी (प्रतिनिधी) – संवेदनशील मनाच्या व्यक्तीने राजकारणात, समाजकारणात असलं पाहिजे. संवेदनशीलता कमी होते, तेव्हाच भोंग्याच्या आवाजावरून स्पर्धा सुरु होते, अशा शब्दांत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टिका केली. एकीकडे राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या घोषणेनंतर भाजपा नेते मोहीत कुंभोज हे 1 हजार भोंगे वाटप करत आहेत. तर, दुसरीकडे भाजपा नेते शेलार हे ठाकरे यांच्यावर टिका करताना दिसत आहेत.     

कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने यावर्षीचा कलागौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना माजी मंत्री तथा आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमात यांनी ठाकरे यांच्यावर निशाना साधला.

कलारंगला 24 वर्षे झाली म्हटल्यावर मी अमितचं वय काय, याचा विचार करायला लागलो. अतिशय कमी वयात आमची उद्योगनगरी सांस्कृतिकनगरी व्हावी, अशा पध्दतीचं स्वप्न पाहून त्यांनी काम सुरू केलं. तर कमी कार्यकीर्दीत मोठं काम अमित गोरखे यांनी कलारंगच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. ते करताना आपले विचार देखील जोपासत आहेत”, असेही शेलार म्हणाले.

आशुतोष गोवारीकर, लतादीदीनंतर मराठी माणसाचं स्थान चिन्मन मांडेलकर यांनी निर्माण केलं. त्यांनी कलाकारी देशाला दाखवली. छत्रपतींवर आठ चित्रपट करण्याचा सुखद धक्का त्यांनी मला दिलाय. शिवरायाचं चरित्र प्रेरणादायी आहे. चिन्मय ही पुढची पिढी असून त्यांच्यावर अपेक्षाचं ओझं आहे. पूर्वीच्या पेक्षा आताचा काळ अवघड आहे. संवेदनशील मनाच्या व्यक्तीने राजकारणात, समाजकारणात असलं पाहिजे. संवेदनशीलता कमी होते. तेव्हाच भोंग्याच्या आवाजावरून स्पर्धा सुरु होते, अशी टिका शेलार राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

Share to