नागरिकांनो पिण्याचे पाणी गाळून व उकळूनच प्या.. अन्यथा !
पिंपरी – शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरण परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे पवना नदीपात्रात गडूळ पाणी येत आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी रावेत येथील पंपींग स्टेशनमध्ये गडूळ पाण्यावर शुध्दीकरण प्रक्रिया करून ते पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडले जाते. हे पाणी पिण्यासाठी अतिशय योग्य आहे. तरीपण नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी उकळून घ्यावे. ते गाळून सुध्दा घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.