अण्णाभाऊंचे विचार भारतातच नव्हे तर रशियापर्यंत पोहोचले – अमित गोरखे
पिंपरी – आज सकाळी आर्डनस फॅक्टरी देहूरोड येथे भारतीय मजदूर संघ, सामाजिक समरसता मंच, अण्णाभाऊ साठे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
विचार मंचाच्या वतीने अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे तसेच अरूण पाटोळे यांचे स्वागत विचार मंचच्या अध्यक्षाच्या वतीने करण्यात आले.
अमित गोरखे म्हणाले, आपण सर्व कामगार आणि संघटना म्हणून अण्णा भाऊंची जयंती साजरी करत आहात. ही गोष्ट अभिमानास्पद आहे. आपण सर्व कामगार हे शस्त्रसाठा हा देशातील आर्मीसाठी तयार करत आहात. म्हणून तर देशातील सर्वसामान्य नागरिक हा सुरक्षीत आहे. अण्णाभाऊ हे एकाच समाजाचे प्रतिनिधित्व करत नव्हते. तर समाजातील सर्व कामगार, शोषत, शेतकरी, वंचिताचे मार्गदर्शक तसेच कैवारी होते.

अण्णाभाऊंचे सर्व भाषेत असलेले साहित्य तसेच त्यांचे विचार सर्वानी आत्मसात केले पाहिजे. त्यांची पुस्तके वाचली पाहिजेत. भारताच्या नाही तर रशियापर्यंत अण्णाभाऊंचे विचार पोहचले आहे. अण्णाभाऊंमुळे कामगार संघटना एकवटली व तिला चेतना मिळाली. येणाऱ्या काळात अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाच्या वतीने सर्व समाजासाठी, विविध योजनांसाठी मी प्रयत्नशील राहील. कोणत्याही प्रकारची मदतीसाठी मी सैदव आपल्यासोबत आहे असे आश्वासन त्यांनी दिले.
संघटनेचे अध्यक्ष राकेश भोंडे, कार्यअध्यक्ष राजकुमार, सरचिटणीस निखिल तापकीर, सहसेक्रेटरी निलेश गायकवाड, गोपाळ कारंजकर, रमेश रमेश सोमनाथ वालकोळी, कारखान्यामधील अण्णाभाऊ साठे विचार मंचाचे अध्यक्ष शिवाजी खंडाळे, महेश शेंडगे, विजय उमाप, नेटके, नंदु नाईक आणि कारखान्यामधील सर्व संघटनेचे पदाधिकारी, कार्यसमिती सदस्य आणि कामगार उपस्थित होते.
पंचशील मंडळ अध्यक्ष राकेश सोनावणे यांनी सुत्रसंचालन केले. अशोक थोरात यांनी परीचय करून दिला. कार्यसमिती सदस्य रुपेश रनधिर यांनी आभार व्यक्त केले.