ओझर्डेत पृथ्वीराज पाटील यांचे पारडे जड

  • नामोहरम करण्यासाठी विरोधकांना करावी लागली एकजूट

महाईन्युज ! प्रदीप लोखंडे

सांगली जिल्ह्यातील ओझर्डे गावातील रखडलेली ४० वर्षांपासूनची प्रलंबित विकासकामे उद्योजक दिनकर पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी मंगल पाटील यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आली. कधी शासनाच्या निधीतून तर कधी स्वखर्चातून हे काम करण्यात आले. मंगल पाटील यांनी रचलेल्या विकासकामांचा लेखा जोखा मांडत त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील देखील यंदा सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गावातील लोकांमधूनच त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह केला असल्याची चर्चा आहे. ओझर्डेतील तरुण, जेष्ठ नागरिक, महिला वर्गाचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पृथ्वीराज पाटील यांचे पारडे जड असल्याने त्यांना नामोहरम करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. विरोधकांनी हातात हात घालून अजित पाटील यांचे आव्हान उभे केले आहे. मात्र त्यांना किती यश मिळेल हे पाहावे लागेल.

अदिती उद्योग समूहाच्या माध्यमातून उद्योजक दिनकर पाटील यांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. सुरुवातीला सामाजिक कामातून त्यांनी गावातील विकासकामे मार्गी लावली. कालांतराने त्यांच्या पत्नी मंगल पाटील गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यानंतर मंगल पाटील यांच्या माध्यमातून सुरु झालेल्या विकासकामांच्या रथाची घोडदौड अद्यापही सुरूच आहे. कोरोनाची दोन वर्षे वगळता तीन वर्षात कोट्यवधी रुपयांची कामे गावात केली असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. ४० वर्षात रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचे काम देखील मंगल पाटील यांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आले असल्याचे ते सांगत आहेत. दिनकर पाटील, मंगल पाटील यांच्या पाऊलावर पाऊल टाकत त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज देखील सामाजिक कामाकडे वळले. त्यांनी तरुणांचा गोतावळा जमवून गावात सामाजिक उपक्रम राबविली. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांची कामाची धडपड पाहून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी त्यांच्या नावाचा आग्रह गावातील नागरिक धरू लागले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सुरु असलेल्या निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले.

उद्योजक दिनकर पाटील यांनी स्वखर्चातून केलेली विकासकामे, मंगल पाटील यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात विकासकामांचा उभारलेला डोंगर पाहता गावात सध्या पृथ्वीराज पाटील यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. त्यांना निवडणूकीत नामोहरम करण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली आहे. महाडिक गट व राष्ट्रवादीतील इतरांनी एकत्र येत अजित पाटील यांचे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र विरोधकांचा प्रभाव पडत नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. नागरिकांचा वाढता कल सध्या पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीमागे आहे. मात्र निवडणूक निकालानंतर त्याबाबत अधिक स्पष्टता येईल.

मंगल पाटील यांच्या मार्फत विकासकामांची मांडणी

पृथ्वीराज पाटील निवडणुकीत उतरल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मंगल पाटील यांच्या कार्यकाळात झालेली विकासकामे सांगत निवडणुकीची रंगत वाढवली आहे. मंगल पाटील यांच्या मार्फत जलजीवन मधून १ कोटी १५ लाखाची योजना गावात मंजूर करून आणली आहे. धनगर समाज बांधवांच्या बिरोबा मंदिरासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडून ३० लाख रुपये मंजूर केले. शासनामार्फत सुमारे २५० घरकुल मंजूर करून आणले. टप्प्याटप्प्याने ते मार्गी लागतील. एआरजीएस रस्ते स्वखर्चातून केले. साडे तीन किमी पाणंद रस्ते करण्यात येणार आहे. कमानी स्वखर्चातून. मॉडेल शाळेत १२८ मध्ये बसवून २७ लाख जेपी कडून आणले. अदिती उद्योग समूहामार्फत प्रत्येक घरी सुमारे ४०० कोरोना किटचे वाटप केले. कोरोना काळात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आली. गावात ५ वर्षात एकदाही भांडण झाले नाही. कायदा सुव्यस्था प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला. ओझर्डेत शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवितात. त्यांच्या मालाची गावातच विक्री होऊन त्यांना फायदा व्हावा या उद्देशाने गावात दर रविवारी आठवडे बाजाराची सुरुवात केली. त्यामुळे सुरूल, नायकलवाडी, घबकवाडी आदींसह आजुबाजुच्या गावांना त्याचा फायदा होत असल्याचे पृथ्वीराज पाटील समर्थक सांगत आहेत. मंगल पाटील यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवणार जाणार असल्याने नागरिकांचा कल त्यांच्या बाजूने दिसत आहे.

सक्षम विरोधकांचा अभाव

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत दिनकर पाटील यांच्या पॅनेलला बहुमत देत सत्तेवर बसविले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्र्वादी मधीलच इतर गटाचे पॅनेल होते. सक्षम विरोधक नसल्याने दिनकर पाटील पॅनेलचे सर्वाधिक सदस्य विजयी झाले. सध्या राष्ट्रवादीतील गट एकत्र आले आहेत. त्यांनी महाडिक गटाशी हातमिळवणी केली आहे. एकत्रित निवडणूक लढवत दिनकर पाटील यांच्या विरोधात आव्हान उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे दिसते. मात्र गावात केलेली ठोस विकासकामे सांगण्यासाठी नसल्याने विरोधक देखील बॅकफूटवर पडले असल्याचे चित्र आहे. त्याचा दिनकर पाटील यांना फायदा होईल अशी चर्चा आहे. अर्थात हे सर्व निवडणूक निकालानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज

मो. नं – 7350266967

Share to