परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने केले फरार घोषीत

मुंबई – राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रूपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे गेल्या अनेक दिवसापासून बेपत्ता आहेत. यामुळे अखेर मुंबईतील किला न्यायालयाने परमबीर यांना फरार घोषित केले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता भर पडली आहे.

परमबीर सिंग हे मागील अनेक दिवसापासून गायब आहेत. अनेक समन्य बजावून देखील ते हजर राहिले नाहीत. परमबीर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल अशी शक्यता होती. पण त्याआधीच खंडणी प्रकरणात परमबीर सिंग यांना मुंबई किला न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांना बुधवारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. गुन्हे शाखेचा अर्ज मंजूर करत न्यायालयाने परमबीर सिंगला फरार घोषित केले. दरम्यान, सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) २ पोलीस निरीक्षकांना अटक होती. नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत. या दोघांनीही गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, तर परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता.

याच प्रकरणी रियाज भाटी आणि विनय सिंग यांना देखील न्यायालयानं फरार घोषित केलं आहे. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांना फरार घोषित करण्याची ही किंबहुना पहिलीच वेळ असल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share to