समोरासमोर या आणि तुम्हीच माझा राजीनामा राज्यपालांना द्या – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही. तुम्ही समोरासमोर या आणि माझा राजीनामा राज्यपालांना द्या,असे जाहीर आव्हान त्यांनी बंडखोरांना दिले.
उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की,माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे.. बोलण्यासराखे बरेच आहे. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाही. अशा परिस्थितीत मला जे कराचे ते प्रयत्न प्रमाणिकपणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून होतो.
माध्यमात अनेक अफवा आल्या. मी भेटूत नव्हतो, हे काही दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट रूग्णालयात. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे.
ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, अशी बातमी पसरविण्यात आली. २०१४ ला एकट्याच्या ताकदीवर ६३ शिवसेनेचे आमदार निवडून आले, ते पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची. पण मध्ल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने.
आमदार गायब झाले. काही आमदारांचे फोन येतात. काल – परवा निवडणुक झाली. हाॅटेलमध्ये गेलो तेव्हा बोललो, ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका. मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम पूर्ण करणारा. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः पवार साहेबांनी सांगितले, जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पवारांचा,सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली .नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही,असे म्हणत ठाकरे यांनी बंडखोरांना इशारा दिला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मला प्रशासनाची खूप मदत झाली.पण हा धक्का.. हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ – पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो. त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की, मी मुख्यमंत्री नको, तर मी पद सोडायला तयार आहे. आज मी वर्षावरचा मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.
कुऱ्हाडीची गोष्ट. ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय. मी राजीनामा देतो. तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुखपद सोडायला तयार आहे.मी संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.
एकदा ठरवू या! समोर या! सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी पद सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई पद नाही. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई आहे. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगावे मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असेच ठेवा,अशी भावनिक साद शेवटी उध्दव ठाकरे यांनी घातली.