शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी मैदानात
– ऐतवडे बुद्रुक येथे आज साधणार शेतकऱ्यांशी संवाद
महाईन्युज : प्रदीप लोखंडे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मैदानात उतरले आहेत. त्यासाठी जनजागृती यात्रा त्यांनी सुरु केली आहे. या यात्रेच्या अंतर्गत आज मंगळवारी (दि. २२) ते ऐतवडे बुद्रुक येथील शेतकऱ्यांशी बैठकीतून संवाद साधणार आहेत. या वेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.
माजी खासदार शेट्टी यांनी रायगडावरून या जनजागृती यात्रेची सुरुवात केली आहे. विविध गावातील शेतकऱ्यांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. त्या अंतर्गतच ऐतवडे बुद्रुक येथे आज संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेबाबत अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पुरेसा पाऊस न पडल्याने शेतीचे नुकसान झालेले आहे. यासाठी पीक विमा योजना मिळणेबाबत शेतकरी आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. तसेच इथेनॉल पासून मिळणाऱ्या पैशांमधून शेतकऱ्याला वाटा मिळावा याबाबतही चर्चा होणार आहे. या बरोबरच उसाचा दुसरा हफ्ता मिळावा या बाबतही चर्चा होणार आहे.
—————————————————-
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज.
– मो. नं – ७३५०२६६९६७