महापौरांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील विविध विकासकामे शहरवासियांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य नियोजन करून त्यांचे आज भूमिपूजन करण्यात आले असून
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील विविध विकासकामे शहरवासियांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य नियोजन करून त्यांचे आज भूमिपूजन करण्यात आले असून
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – ‘पावन झाले आहे पिंपरी चिंचवडचे खोरे, कारण महापौर आहेत माई ढोरे’ अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरवात करून मिलिंदनगर
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचा-र्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असून सेवानिवृत्तीनंतरचा तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंददायक आणि आरोग्यदायी जावो
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) –इथल्या संत महात्म्यांनी तसेच साहित्यिकांनी मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी मातीचे सौंदर्य, संस्कृती आणि परंपरा जनमानसात रुजवली असून मराठी भाषेचा आपल्या दैनंदिन व्यवहारात वापर करुन या भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नाशिकफाटा बीआरटीएस रोडवरील कल्पतरु सोसायटीजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महापौर माई ढोरे यांनी अभिवादन केले. नागरिकांना महापौर माई ढोरे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास पक्षनेते नामदेव ढाके, जैवविविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, प्रमोद ओंभासे, प्रेरणा सिनकर, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगर येथील महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय मेस्त्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय मेस्त्री यांनी काही निवडक कविता आणि संतांची वचने सांगत मराठी भाषेची महती विशद केली. ते म्हणाले, मराठी साहित्याला संतांच्या उज्ज्वल परंपरेचा सांस्कृतिक वारसा लाभला असून त्या माध्यमातून समाजाला त्यांनी नैतिक शिकवण दिली. तर महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या लेखणीने समाजाचे प्रबोधन केले. कुसुमाग्रज यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मराठी साहित्यातील अग्निसाक्षी ज्वाला संप्रदायाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे . त्यांनी रसिकांच्या मनावर पाच दशकांहून अधिक काळ प्रभाव गाजविला . श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, आस्वादक समीक्षक म्हणून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे नाव अग्रस्थानी आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी कुसुमाग्रज यांचे योगदान अनन्यसाधारण आहे, असे प्रा. मेस्त्री यांनी सांगितले. राजभाषा असलेली मराठी ही ज्ञानभाषा होऊन मराठी भाषकांची चांगल्याप्रकारे प्रगती होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात या भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी तात्यासाहेब शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकातील ‘कोणी घर देता का घर’ हा संवाद सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ आणि ‘सांगा कसं जगायचं’ या कवी मंगेश पाडगावकर यांच्या कविता सादर करून गायकवाड यांनी रसिकांची वाहवा मिळवली. ‘प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं’ आणि ‘कणा’ ही कुसुमाग्रजांची कविताही त्यांनी सादर केली. या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर आभार किरण गायकवाड यांनी मानले.
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवरायांचा जयघोष करत आबाल वृद्धांच्या उपस्थितीत आज शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – पर्यावरण आणि स्वच्छाग्रह उपक्रमाचा संदेश सायकल स्पर्धेच्या माध्यमातून देण्यासाठी रविवार (दि. २७) महापालिकेच्या वतीने सायक्लॉथॉनचे आयोजन करण्यात
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – नागरिकांनी सुदृढ व निरोगी रहाण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे असुन आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – संत सेवालाल महाराज यांचा मानवतावादी दृष्टीकोन लोककल्याणासाठी महत्वाचा असून समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सतत उपयोगी पडेल, असे प्रतिपादन
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने उद्यानांसारख्या नैसर्गिक सानिध्यात वेळ घालवल्यास ताणतणाव दूर होण्याबरोबरच उत्तम आरोग्यही राखले जाईल असे प्रतिपादन
Read moreपिंपरी (प्रतिनिधी) – भारताच्या लोकशाही परंपरेचे जतन करून प्रत्येकाने निर्भयपणे आणि नि:पक्षपातीपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीस अधिक बळकट करावे असे
Read more