भाजपने आमच्याच नव्हे तर ‘एनडीए’तील मित्रपक्षांच्याही पाठित खंजीर खुपसला – आदित्य ठाकरे

मुंबई गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजप, कॉंग्रेस, आप आणि तृणमूल कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत असून घरोघरी जाऊनसर्वच सर्वच पक्ष प्रचार करण्यावर भर देत आहेत. त्यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे ही आता गोव्याच्या मैदानात प्रचाराला उतरले आहेत.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी गोव्यातून भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नव्हे तर एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठितही खंजीर खुपसला आहे. त्यामुळेच एक एक करून सर्व पक्ष भाजपला सोडून गेले, असा हल्लाबोल करत आम्ही कोणत्याही घोडेबाजारावर विश्वास ठेवत नाही. शिवसेनेचे वाघ असतात. वाघांचा बाजार नसतो, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

तसेच पुढे आदित्य म्हणाले कि, आम्ही शिवसेनेचं किंवा कोणत्याही पक्षाचं भवितव्य ठरवण्यासाठी आलो नाही. तर आम्ही केवळ गोव्यातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढायला आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्लाही चढवला.

Share to