राज्यात हायअलर्ट, चक्रीवादळ व ढगाळ वातावरणाचा शेतीपिकांना फटका
मुंबई – पुढील 3 ते 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असणार आहे. असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण कालपासून निर्माण झालं आहे तर काही ठिकाणी हलक्या सरीही बरसल्या आहेत.
बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. आणि याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबत महाराष्ट्रावरही होणार आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस हलका पाऊस राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच, या ढगाळ वातावरणाचा शेतीवर जास्त परिणाम दिसून येत असून, आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसू शकतो.