‘त्या डोमकावळ्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता आली नाही’, संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा

मुंबई – सध्या शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली आहे. “दिल्लीत जिथे मी राहातो, तिथे चांगल्या प्रकारचे मोर आहेत. काही वेळा मी तिथे माझ्या आजूबाजूला डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही, अशी शब्दांत राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर टिका केली आहे.

तुम्ही संजय राऊतांवर कितीही आरोप करा, माझ्या पाठिचा कणा ताठ आहे आणि मन फार खंबीर आहे. मी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो”. “महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे. इथे तुळशीचं पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटतं की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो की, एवढं करूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, गांदी कुटुंबाचंही तेच म्हणणं आहे की हे सरकार ५ वर्ष टिकेल आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केलं, तर २५ वर्ष हे सरकार हलणार नाही”, असा दावा राऊतांनी केला आहे.

राज्यात पुलोदनंतर असा प्रयोग पहिल्यांदाच घडला. आत्ताचं सरकार पुलोदचीच प्रतिकृती आहे. पुलोदचे नेते शरद पवार होते. आता देखील शरद पवार यांचं मार्गदर्शन, उद्धव ठाकरेंचा भक्कम पाठिंबा, गांधी परिवाराचं असलेलं पाठबळ यातून हे सरकार निर्माण झालेलं आहे, असं राऊत म्हणाले.

Share to