नवाब मलिकांच्या राजीनाम्याबाबत लवकरच निर्णय, जयंत पाटील यांची माहिती
मुंबई – ’मलिकांना दिलासा मिळाला नसल्यामुळे आणि यातच 31 मार्च हे फायनान्शियल इयर एन्ड असल्यामुळे पर्यायी जबाबदारी देण्याचा आमचा विचार आहे. मुख्यमंत्री मलिकांबाबत अंतिम निर्णय घेणार असून मलिकांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे देणार हे राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्रीकडे ठेवणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
सध्या डिपार्टमेन्टचं काम पूर्णपणे ठप्प झालंय, त्यामुळे ते कारण जबाबदारी इतर मंत्र्यांना देण्यात येणार असा निर्णय झाला आहे. ते पुढे म्हणाले, फडणवीसांनी जो पेनड्राईव्ह दाखवून आरोप केले त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. पेनड्राईव्हचा खरेखोटेपणा आहे. असे अनेक पेनड्राईव्ह निघू शकतात, त्याची सत्यता पडताळणी केली पाहिजे’ असेही ते म्हणाले आहे.