शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंड प्रकरणात शरद पवारांनी हस्तक्षेप करताच भाजपाचा लेटर बाँम्ब
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपाने या वादात उडी घेतलीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पक्षाच्या वतीने पत्र पाठवलं आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने घाईघाईत शासन आदेश जारी करत असून यासंदर्भात संशय घेण्यास वाव असल्याचं पत्रात म्हटल आहे. ज्या वेगाने शासन आदेश जारी केले जात आहेत, ते पाहता यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी भाजपाने केलीय.
राज्यातील राजकीय स्थिती तीन दिवसांमध्ये अत्यंत अस्थिरतेची झाली आहे. दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारने १६० हून अधिक शासन आदेश काढलेले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली काढलेले जीआर संशय वाढवणार आहेत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.