नवरात्रौत्सवात तुळजाभवानी मंदिरात गर्दी होवू नये म्हणून संस्थानाकडून नियमावली जाहीर
तुळजापूर – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता राज्य सरकारने मंदिरांची दारे पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रौत्सवात (Navratri) मंदिरे पुन्हा सुरू (Temples reopen) होणार आहेत. मात्र, असे असले तरी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक अनिवार्य आहे. नवरात्रौत्सवात मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून (Tuljabhavani Mandir Sansthan) नियमावली जाहीर (Guidelines for Navratri) करण्यात आली आहे.
7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, दररोज पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या काळात 15 हजार भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
ही आहे नियमावली
दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश
परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच जिल्ह्यात प्रवेश
लसीकरण न झालेल्या भाविकांना 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक
गर्दी न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन बंधनकारक
चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक
सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक
नवरात्रौत्सवात कोजागिरी पौर्णिमा रद्द
18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात बंदी, तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश नाही
तुळजाभवानी मंदिरात 65 वर्षांवरील नागरिकांना तसेच गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही
भाविकांना केवळ मंदिरात प्रवेश, अभिषेक आणि इतर विधींना परवानगी नाही